26 September 2009

छोटीशी गोष्ट!!

अनेकदा गोष्ट तशी फुटकळच असते.. म्हणजे अनेकांच्या लेखी ती कदाचित दखल घेण्यासारखी नसते ही. मी जवळ जवळ अडीच वर्षे झाली ब्लॉगिंग करते आहे. कधी नियमित कधी काही ना काही कारणानं होणारा विलंब... परंतू ब्लॉगिंगशी नातं कायम आहे. तशातच ब्लॉगरनी एखादा आवडीचा ब्लॉग फ़ॉलो करणारी सुविधा दिली. माझा ब्लॉग साधाच.. त्याची भाषा आणि त्याचे विषय दोन्ही साधेच... आणि त्यामुळं माझा ब्लॉग कोणी फ़ॉलो करेन असं मला वाटलं ही नाही.

एक दिवस माझ्या पोस्ट्स बघत होते तर माझ्या डायरीच्या ब्लॉगला एक फ़ॉलोवर दिसला... क्या बात है!!! असा विचार करत चेहेर्‍यावर एक हसू आलं.... मग एक दिड महिन्यानी अजून एक फ़ॉलोवर दिसला.. कित्येकांच्या ब्लॉगचे ५० १०० फ़ॉलोवर्स असतात... माझ्या साध्या ब्लॉगला कोणी तरी फॉलो करतय ही भावना छान वाटली. आज माझ्या अजून एका ब्लॉगला एक फ़ॉलोवर आहे... तिथे नवीन पोस्ट वाढवावीशी वाटली... गोष्ट छोटीशीच आहे. पण खुप छान वाटतय.

माझा साधासुधा ब्लॉग फ़ॉलो करण्यासाठी अनेक धन्यवाद!!!

सोनल

24 September 2009

पाऊस

इथं पहाटे आलो. एअरपोर्टवर सूर्योदयानं स्वागत केलं ते ही ढगांच्या तलम पडद्या आडून. तो दिवस तसा बर्‍यापैकी ढगाळ होता. आभाळ दिवसभर होतं. किंचित शिराळं... संध्याकाळी अंधारून आलं. इतकं की ४ वाजता आम्ही घरात दिवे लावले होते. चक्क ७ साडे ७ वाजल्या सारखं जाणवत होतं. टप टप टप टप पावसाची थेंबं वाजली. "मी आलो तुला भेटायला... माझी धरणी, माझी धरा.. तुला नखशिखांत भिजवायला... मी आलो.." झाडांवर, पानावर फुलांवर... सगळीकडे आगमनाची ग्वाही देत पाऊस आला. धो धो... इतका जोरात बरसला की जणू कैक वर्षांनी दोघं भेटले असावे.

असा पाउस मला आवडतो. त्यानं यावं आणि जीव तोडून बरसावं. मग मला बाल्कनी प्रिय होते. छान खुर्ची टाकून, वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन, एक पुस्तक, माझी आवडती निवडक गाण्यांची प्ले-लिस्ट आणि मी... आळसावलेल्या, उन्हानं काहिली झालेल्या माझ्या मनाला हा असा कोसळणारा पाऊस तृप्त करतो. मला वर्तमानातून भुतकाळात घेऊन जातो... मी किती मागे जाते?... डिग्रीच्या वर्षात? अजून मागे.... अकरावी बारावी???..... म्म्ह्म्म्म.... अजून मागे... नववी दहावी? नाही.... मी माझ्या पहिली दुसरीतला पाऊस आठवते... आमच्या घरावर कोसळणारा पाऊस मला नेहेमीच दुसर्‍यांच्या घरापेक्षा जोरात पडतो असा वाटायचा... "बघ तुझ्या घरी किती जोरात पाऊस पडतो.. माझ्या घरावर हळू पडतो.." असं मला कोणी चिडवलं की मग मी म्हणायची,"माझ्या पावसाला मी आवडते..आमचं घर आमचं अंगण आवडतं... अंगणातली झाडं फुलं आवडतात.. म्हणून तो आम्हाला भेटायला पळत येतो..." मला अजूनही माझ्या घरावर पडणारा पाऊस जोरातच वाटतो.

आज ही असाच पाऊस पडला... मी पुन्हा लहान झाले... लहानपणी माझ्या घरावर आलेला पाऊस आठवला... शाळेतून भिजत येतानाचे दिवस आठवले.. पावसाची म्हटलेली गाणी आठवली... आमच्या घराचं अंगण, झाडं फुलं आठवली.... पावसात चिंब भिजलेली घरापुढची लॉन, निशिगंध आणि मोगर्‍याच्या फुलांची रोपं आठवली... मोठं बदामाचं झाड आठवलं.... स्वस्तिकाच्या फुलांचं झाड आठवलं.... चमेली आणि जुईच्या फुलांची वेल आठवली... परसदारातला पारिजात आठवला....

19 September 2009

माझे मासे

मुलाला आवडतं म्हणून अगदी हौसेनी आम्ही घरी एक छोटा ऍक्वॅरियम आणलं. माशांना दिवसातून दोन तीन वेळा जेवण द्यावं लागतं. ती वेळ अंगवळणी पडलीये. म्हणजे सकाळी चहा झाला की एकदा, दुपारी जेवण झालं की आणि शेवटी झोपण्यापूर्वी एकदा असं तीन वेळा मी त्यांना जेवण देते. आमची बदली बेंगलोरहून पुण्याला झाली. आणि ऍक्वॅरियमचं कसं करायचं यावर आमचा विचार विनिमय सुरू झाला. सर्व डोमेस्टीक विमानसेवा देणार्‍यांना फोनाफोनी झाली आणि शेवटी जेट एअरवेजनी हमी दिली की आम्ही मासे तुम्हाला पुण्यापर्यंत कार्गो सेवेद्वारे पोहोंचवून देऊ. तुम्ही तिथे उतरवून घ्या. आता दुकानातून पॅक करून एअरपोर्टला कार्गोमधे सुपूर्द करून तिथून पुणं... आणि पुणे एअरपोर्ट ते घर असा एकूण ५ तासांचा प्रवास त्या माशांना करायचा होता. माशांचा जीव बघता हा ५ तासांचा प्रवास त्यांना झेपणं अगदी अशक्य होतं. त्यात आपल्याकडे ऍक्वॅरियमचे मासे ट्रान्सपोर्ट होत नाहीत. त्यामूळं तशी सोयही ते विमान वाले करत नाहीत. कार्गो वाल्यानी सांगितलं की मासे एका जाड ट्रान्सपरंट पिशवीमध्ये घालून व्यवस्थीत पॅक करून मग कागदी कार्टन मध्ये घालून आम्हाला द्या. मला कार्गो द्वारे मासे पाठवणं पटलं पण कुठे ना कुठे मनात एक काळजी होती. ज्या माशांना इतके दिवस जपलं त्याच्या जीवाची हमी कोणीच देत नव्हतं. एकीकडे वाटत होतं की मासे कार्गो करावेत. एकीकडे वाटत होतं की नको... कोणाकडे तरी देऊन जावं... मग वाटलं की दुकानवाल्याला विचारावं की "बाबा रे.. यांची काळजी घेशील का?" अगदी सामान पाठवायच्या दिवशी पर्यंत मला त्या माशांना कोणाला द्यावसं वाटलं नाही... पण एक निर्णय घेणं भाग होतं. माशांना कार्गो करायचं नाही या निर्णयावर आलो तेंव्हा मला खुप वाईट वाटलं. एक दोघांना विचारलं पण त्यांच्यात फारशी उत्सुकता दिसली नाही. जमेल की नाही अशी शंका त्याच्या मनात होती. मग शेवटी एका दुकान वाल्याला विचारलं. माझ्या माशांचं नशीब चांगलं... ज्या दुकानवाल्याला विचारलं तो मत्स्यप्रेमी निघाला... त्याला फोन करून बोललो त्यावेळी तो म्हणाला, "साहेब मी माशांवर प्रेम करतो, त्यांना जगवतो. तुम्ही त्याची चिंता करू नका. कधीही मासे आणून द्या... मी घ्यायला तयार आहे." संध्याकाळी मासे पॅक करून आम्ही दुकानात नेले. ते कसे आहेत, सशक्त आहेत की नाही, कोणत्या जातीचे आहेत, जोडी आहे की नाही... काही ही प्रश्न न विचारता, कुठली ही चिकित्सा न करता, आणि विषेश म्हणजे केवळ फोन वर बोलून त्या माणसानं ते ठेउन घेतले. "मी त्यांना जगवीन.. तुम्ही काळजी करू नका असं आश्वासनही दिलं" अजून काय माणूसकी असते? त्या माणसाच्या दुकानात अनेक अनेक मासे होते... अनेक जातींचे अनेक रंगांचे... त्यानी अगदी सहज आमचे मासे त्याच्या माशांमधे सोडले... आणि आमचे मासे ही त्या माशांमधे रमून गेले... दुकानातून निघताना त्या माशांकडे मी एकदा डोळे भरून पाहिलं. माझ्या ऍक्वॅरियम मध्ये नवीन मासे नक्की येतील पण माझे हे मासे मला दिसणार नाहीत...

रात्रीचं जेवण झालं... ऍक्वॅरियमच्या टॅंक खाली असलेल्या कपाटाचं दार अनपेक्षीत उघडलं... पेलेट्सचा डबा बाहेर काढला आणि लक्षात आलं ऍक्वॅरियमचा टॅंक रिकामा झालाय... तिथे मासे नाहीत... वाईट वाटलं... I missed them...

04 September 2009

माझी डायरी........

शाळेत असताना पासून काही वाचनात आलं आणि मला आवडलं की मी माझ्या वहीत डायरीत ते टिपून ठेवायची. कथासंग्रह, कवीता, मुक्त लेखन असं थोडंफार वाचन झालं माझं. त्यात विशेष आवडलेलं म्हणजे व,पु. काळॆंच वपूर्झा. त्या पुस्तकाची पारायणं झालीत. एकदा मागे esnips साईट वर वपुर्झाची एक ऑडियो सापडली. ती इथे अपलोड केलीच आहे. असो!!

व्यक्ती, नातेसंबंध, वस्तू, यांवर अनेक कविता किंवा चारोळ्या माझ्या वाचनात आल्या... ऋतूंवरील चारोळ्या एकदा कॉलेजमध्ये असताना वाचनात आल्या होत्या. त्या चारॊळ्या मी माझ्या डायरीत लिहून घेतलेल्या. वाचनात आलेल्या पुस्तकांमधली कोटेशन्स, एकादा पॅरेग्राफ, कोणा शायराची शायरी... एक ना अनेक टिपणं होती त्यात. काळाच्या ओघात ती माझी डायरी कुठंतरी ठेवण्यात आली आणि नंतर या पुस्तकामागून त्या पुस्तका मागे अशी मागं सरकत कपाटाच्या कोपर्‍यात जाऊन बसली. कदाचित डायरीनंच मला बोलावलं असेन... काय माहिती? ८ - १० वर्षांनंतर तो कोपरा चाळवल्या गेला... तर ती डायरी सापडली. स्वच्छ पांढरी पानं पिवळसर झाली होती. पण पानांची इस्त्री गेली नव्हती... एकही पान मऊ पडलं नव्हतं. ताठा एकदम तसाच... पहिल्या सारखा...

त्या माझ्या डायरीतली निवडक वेचणं मी माझ्या कोट्स या ब्लॉगवर देणार आहे. त्याचा दुवा हा...

http://unreadquotes.blogspot.com/



~ सोनल

21 August 2009

Hilarious Essay

My friend forwarded this mail to me. Originally it is in Marathi language. Trying to translate it in English. Enjoy!!!

Essay topic :- My favourite Bird : Hen

I like all animals and birds. They taste yummy. Hen is specially tastier than other animals and birds. So I like hen more than other animals and birds.

Different tasty eatables can be made from Hen. I cant cook them. But I can eat them.

Hen is vegetarian. So I feel respect for Hen. Mahatma Gandhiji was also vegetarian. So I feel respect for him too.

Hen gets fever too. When human beings get fever, they boil water and drink. But if they eat a Hen having fever, then that man can get that fever and all his/her worries can be vanished forever. This fever is known as "Bird flu" or something. I dont know Mathematics and English. I get fever when I study them in school.

When we hit stone to a Hen she makes "Pakaak" noise. I like that noise. So I like Hen.

~~~~~~~~~~


The original post of this translation is at the following link. If you understand Marathi you will enjoy the original post more than this translation

Link for original marathi post. :- http://majhidiary.blogspot.com/2009/08/blog-post_20.html

20 August 2009

भन्नाट निबंध

एका सुपीक डोक्यातून आलेला हा भन्नाट निबंध...

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.

कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.

कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.

कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.

कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. म्हणुन माझा आवडता पक्षी कोंबडी आहे.

08 August 2009

दुधवाले मामा

संध्याकाळी नेहेमी प्रमाणे खाली फिरत होते. अनेक वर्षांनी मी गवळी पाहिला... डोक्याला मळकट फेटा बांधलेला, सायकलला बांधलेली दुधाची कॅन, मागे लटकवलेली लिटर - अर्धा लिटरची मापं, आणि सायकलला बांधलेल्या त्या टिपीकल तुपकट ओशट दोर्‍या.. निमीषार्धात मी जवळ जवळ १२ १३ वर्ष मागे गेले. माझ्या डिग्रीची ही गम्मत आठवली... माझ्या सोबत इंजिनियरींगला शिल्पा होती.. माझी पहिली पासूऩची मैत्रिण... अगदी पहिली मैत्रिण.. आमचा ठेपा कायम तिच्याकडे असायचा. स्पेशली परीक्षेच्या आणि सबमिशनच्या काळात.. नाईट-आऊट्स असायचे.. तर शिल्पाकडे दुध द्यायला गवळी यायचे. आम्हा सगळ्याचे ते दुधवाले मामा होते. बाहेर फटफटी थांबल्याचा आवाज आला की आम्हाला समजायचं की दुधवाले मामा आले.... काकू, म्हणजे शिल्पाची आई, कायम म्हणायची," मामा दुध पातळ देताय..." आणि दुधवाले मामांचा ठरलेला जवाब असायचा, " नाही हो बाई, दुधच तसं येतयं..." आम्ही सगळेच हसायचो या संवादाला.. वर्ष सहा महिने हे सगळं निवांत आणि सुरळीत चाललं होतं... कॉलेजला येता जाता दुधवाले मामा दिसायचे... एक दिवस दुधवाले मामा पाण्याच्या नळाजवळ कॅन धुताना दिसले. कॅन धुवून त्यांनी धुतलेल्या कॅन मधलं पाणी दुसर्‍या कॅन मधे टाकलं.. आम्ही मैत्रिणींचा आगाऊपणा उफाळून आला... "काय मामा कॅनमधे दुध आहे का?" आम्ही मस्करी करत विचारलं. आमच्या मस्करीला मामांनी मस्करीत उत्तर दिलं "हो... आहे.. :-))" आणि बास!! त्या नंतर आम्ही सगळे त्यांना चिडवायचो, " मामा, तुम्ही दुधात पाणी घालून देता." आणि नेहेमी प्रमाणे मामाही ठरलेलं उत्तर द्यायचे," नाही दुधच तसं येतं"...

"चल पाऊस येतोय. लाईट जायच्या आत घरी जाऊ" या वाक्यानं भानावर आले. आज १२ १३ वर्षांनी गवळ्याला पाहिलं आणि जुन्या आठवणीचा कोनाडा पुन्हा उघडला... आमच्या डिग्रीच्या वेळी ते मामा म्हातारे होते.. आज कसे असतील? अजूनही तेच दुध पुरवत असतील का शिल्पाकडे? आम्ही पाणीवाले मामा म्हणायचो त्यांना.. त्यांना आठवत असू का आम्ही? एक ना अनेक प्रश्न मनात येत गेले.

कधी मधे नांदेडला जाणं झालं तर काकूंना नक्की त्यांच्या बद्दल विचारेल.

~ सोनल

07 July 2009

Friendship

I came here last year in July! Made new friends in a very new atmosphere. We are seven.. Me, Shanti, Chandrani, Miki, Bhavna, Prajakta and Anu.. some times someone joins us and leaves us. but we seven are intact. Come whatever we stand by each other. Seven people from seven different traditions.. seven different mindsets and seven different attitudes. Coping with them all was challenging and a little bit of fun rather than being difficult. One talks a lot and other one rarely says a word... One asks a lot and other one answers every single statement.. One praises a lot and other one likes being praised... There are so many different personalities... and I have got a few of them in my group.. One complete year nw I am in touch with my friends... Soon after we came to India we shifted from that place in Kaggadaspura to new place in Marathalli. I called them all my home for a small treat. We had some snacks and had a great time together.

I tried to make new friends here in Marathalli. Then Isnt that strange? I could not find that kind of friends as I got in Kaggadaspura. I called them all home for a small re-union meet. We met after some 5-6 months. There was same josh same masti and same live time. After that we met on my birthday party. Another get-together... Another session of joyful time. Now I donno whn we gonna meet again.. So lets wait till another get together... Galz be prepared for another meet!!!!!!!

May God bless our group and may we never part from each other.

02 July 2009




After Tanmay learn riding bicycle, this is his first day of riding his bicycle on his own... We can clearly see him balancing cycle. Bravo Tanmay.. Well done..

28 June 2009

I am sorry

When I was in school, one of my friends gave me a quote.. it stated as follows:

Its what life is all about
what you are in life
depends on what you choose
whether you accept every challenge
or simply refuse.......
To lend someone a helping hand selflessly...
To share someones burdon effortlessly.....
Its what life is all about
Really!!!


Isnt that true? When I remember how my parents were with me, how my grand parents were with me.... I feel there were selfless and their behaviour was effortless. Yelling, getting irritated was the thing which I did on them... but they never were neither they are now getting irritated or yelling back on me. I had my choices but they never had.. I made mistakes but they always forgave me.. It was me who wanted all things at right time.. but it was them who always said,"This is the right time when you gave this to us..."

I feel guilty for my mistakes and my behaviour. Try to patch it up but then the time whn I hurted them a lot will never be back again. I cant change tht time which made them sad because of my behaviour. All that I can do is correct my mistakes and dont repeat them again.

I am sorry...

18 June 2009

अर्चना......... लवकर ये!!

आज सकाळी सकाळी अर्चूची आठवण आली. कारणही होतं म्हणा त्या आठवणीला.. आम्ही दोघी मिळून मार्केट मधे धमाल करतो. "वाढलं वाढलं वाढलं... " "ए तुझं काय स्टेटस आहे मार्जिनला?" "आईला... पडलं की!!!" "हे खुप बोअर करतय!!" आम्ही धमाल करायचो. अर्चूसोबत ऑनलाईन भेटून आणि बोलूनही जवळ जवळ महिना होत आलाय.. हे सगळं मिस करतेय. ती असली सोबत की मग टेन्शन रिलिफ होतं थोडं. जरा बरं वाटतं.

सध्या माहेरी धमाल करतेय ती. आणि मी तिला इथे मस्तपैकी मिस करतेय. आता लवकर ये इथे वापस ये अर्चना..

22 May 2009

पाऊस पडून गेल्यावर

आज संध्याकाळी हवेत थोडा गारवा होता. ती उन्हाळा संपत आल्याची चाहूल होती... कुलरची थंड हवा संपणार, गारेगार कुल्फी आणि आईसक्रिम संपणार, पन्हं आणि रसना संपणार.... दही, आमरस संपणार, छान छान सरबतं संपणार.. थंडाई, ज्युसेस आणि कैरीचे मस्त प्रकार संपणार....

एकीकडे उन पडलं खुप म्हणून आरडा ओरडा करायचा आणि मग वर्षभरानंतर आलेल्या पहिल्या पावसानी गारवा आणला की हाच उन्हाळा संपणार या साठी हु्रहुर करायची.... आज काहिसं वेगळं वाटलं,

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले…
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले....

पाऊस हवाहवासा ही वाटला आणि उन्हाळा संपूच नये असं ही वाटलं. येणारा पाऊस काय काय घेऊन येणार??? थोडी तारांबळ, थोडा गारवा, जुन्या रफी, लता, किशोर, आशा या दिग्गजांच्या कॅसेट्स आणि सीडीज पुन्हा बाहेर येणार... गरम वाफाळलेल्या कॉफी आणि चहाचे मोठे मग्ज बाहेर निघणार, आईच्या कॉटनच्या साड्यांची केलेली रजई बाहेर येणार, जुन्या आठवणी, जुन्या मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स फ्रेश चेहर्‍यांनी भेटणार..... गाडीवर जाताना उन्हानं होणारी मनाची काहिली थांबून मिलिंद ईंगळेच्या गारवा मधील ओळी आठवणार....

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा.......

पाऊस नक्की पाहिजे!! उष्णतेनं तापलेली धरा थंड जलधारांनी तृप्त करण्यासाठी.... मरगळलेल्या सृष्टीला नवचैतन्य देण्यासाठी..... नवीन पालवी, नवी फुलं नवी फळं, नव्या इच्छा, नवी स्वप्नं, नवा दिवस, नवा पाऊस आणि तोच आपला हवा हवासा ऋतू... आपला पावसाळा..... आकाश पाण्यानं भरून जईन, टप टप थेंब वाजतील.... पावसात भिजण्यासाठी, ते थेंब झेलण्यासाठी मन पुन्हा पुन्हा आतुर होईन...

ये पावसा ये.... लवकर ये.... Welcome Rain!!!

03 May 2009

कौतुक

आजच्या बहुसंख्य जणांना विचारलं की "आपला राष्ट्रीय खेळ कोणता हो?" आणि चुकून हॉकी असं बरोबर उत्तर दिलं तर मला, त्याला / तिला सांगावसं वाटेल की "बाबा, आता कोणीतरी क्रांती करा, संप, आंदोलनं करा आणि आपला राष्ट्रीय खेळ हॉकी बदलून क्रिकेट करा." अरे किती तो क्रिकेटचा उदो उदो! जेवढे स्टार्स पुढे आलेत ना क्रिकेटच्या टिम्स साठी त्यातल्या एकानं तरी हॉकी प्रिमियर लिग साठी टिम स्पॉन्सर केली का? किमान त्यांना माहितिये का की आपल्या देशाचा खेळ हॉकी आहे म्हणून?


भारतात जेवढी दैना हॉकीची झालीये ना तेवढाच उदो उदो क्रिकेट्चा झालाय. एकट्या क्रिकेटलाच दोष नाही देत मी. तीच गत टेनिस, बॅडमिंटनची पण आहे. सानिया मिर्झा, महेश भुपती, लिऍण्डर पेस असे दोघं तिघं गिने चुने टेनिस प्लेअर्स... त्यांचा सत्कार आणि काय काय होतं पण अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारतानं मलेशियावर ३-१ अशी मात करत तब्बल १३ वर्षानी या करंडकावर आपलं नाव कोरलं!!! आपलं नाव..... भारतीय संघाचं नाव... किती अभिमानाची ही गोष्ट किती जणांनी साजरी केली? २००३ साली भारतीय क्रिकेट संघ विश्वकप स्पर्धेच्या पुढच्या फेरीत पोहोंचावा म्हणून देशभर जप तप आणि यज्ञ झाले होते! अझलान शाह करंडक खेळण्यासाठी भारताचा संघ कधी गेला हे कोणाला कळलं ही नाही. ना त्यांना शुभेच्छा द्या असं कोणत्या चॅनलवाल्यानी सांगितलं. आयडिया फोन सांगतो क्रिकेटर्सशी बोला म्हणून.... हॉकी प्लेअर्स कुठे गेलेत हो आपले???? १९९५ नंतर २००५ साली इंग्लंडने अशेस ही क्रिकेटची स्पर्धा जिंकली तर इंग्लंडच्या राणीनं राजवाड्यात पार्टी दिली होती. त्या टिमची ओपन बस मधून फेरी काढली होती. आणि महिना दिड महिना कौतुक चाललं होतं. आपण १३ वर्षांनी अझलान शाह करंडक जिंकला तर त्याचं फारसं नाव ही दिसलं नाही आपल्या चॅनल्सवर. आपल्या खेळाच्या किंवा आपल्या स्वतःच्या काही गोष्टीं बाबत आपण स्वतः इतके उदासीन का आहोत? आपण आपल्या खेळाचं, खेळाडूंच, कौतुक केलं नाही तर कोण करणार???

08 April 2009

प्रोफ़ाईल विझीट काऊंटर

मी कुठलीतरी लिंक क्लिक केली आणि माझं प्रोफ़ाईल विझिट काऊंटर जे ब्लॉगर देतं तेच काम करेनासं झालं. आठवडाभर मी इकडं तिकडं शोधाशोध केली आणि शेवटी उधारीचं काउंटर घेतलं एका साईटवरून. आज विचार करतेय इतकी का मारामारी केली असावी मी? ते ही प्रोफ़ाईलला किती विझिट्स झाल्या फक्त येवढच चेक करण्यासाठी???

बरं! जेंव्हा मी नेट सर्फ़ केलं ना त्यावेळी माझ्यासारखे प्रोफ़ाईल विझिट काऊंटर बंद पडलं म्हणून आरडा ओरडा करणारे अनेक जण होते. मग थोडं बरं वाटलं की चला आपल्यासारखे अनेक रेस्टलेस लोकंही आहेत इथे म्हणून..

एक नवीन ब्लॉग ऍड केला तेंव्हा ब्लॉगरचं काऊंटर आपणहून अपडेट झालं पण नंतर ते पुन्हा बंद पडलं. आता बघू काही आयडिया कोणी सुचवतं का ब्लॉगरचं काऊंटर अपडेट कसं करायचं ते..

तो पर्यंत keep reading and keep commenting :-)

06 April 2009

Rain rain dont go away...

u like rain???? cloudy clumsy and dull start of the day... rain drizzles around.. I like sitting in balcony.. watching rain.. ppl wearing raincoat, carryin umbrella, wearing waterproof rain boots... haha! wht a pity.. they kill their desires! u ever tried getting wet in rain drizzles? its light rain... not a downpour... get a dress on.. and go out.. without umbrella, without a raincoat.... go to the backyard, stretch hands out, look above.. rain droplets they enter ur eyes... store them there... dont let them wash off.. those tiny droplets become ocean of tears in ur loneliest moments... each moment u spend away from ur near n dear ones is lonely... time seems to be stopped... day seems to be longer than usual... take a break from ur routine... grab a pillow, hold it near u, burry ur face in it and doze of in arms.... mmmmmmmmm what a day! no work, no tension, just rest.... sometimes feels we need someone very special and affectionate... but then u never knw whom u need and what u need and when u need,

get wet in rain... till ur heart feels enuf, till mind gets tired and stretch the strength of ur body till ur heart gives up! make most of tht moment... let raindrops enter ur hair, make them wet, over ur face, ur hands ur body, be like rain... make everyone wet, make a lady a dripping beauty... make a child jump in its puddle give all ur happiness and vanish off... isnt tht raindrop is happiest of all? it has nothing to worry about expectations... because a tiniest raindrop is so pwerful tht it brings a smile on everyones face... from a child to an old man..... child wants to get wet in rain... a young ones wants to get wet in rain, youth are crazy about getting dripping wet in rain.. elder ones haha!! they have their desires for rain..... a tiny rain drop makes everyone happy... why cant we? we have responcibilities... so? rain also has... we have expectations... well! thr u go.. rain doesnt expect....

give give and just keep giving..... till ur last breath!

29 March 2009

हेमंत काका धानोरकर

तन्मयची परीक्षा संपली. आणि बघता बघता रिझल्ट पण लागला. रिझल्ट चांगला आला. रिझल्ट दिवशी सगळ्याची आठवण आली. पण सर्व जणांमध्ये प्रकर्षानं कोणाची आठवण आली असावी तर ते म्हणजे स्व. हेमंतकाका धानोरकर. मला आठवतय आम्ही शाळेत होतो. औरंगाबादला नुकतचं शिफ़्ट झालेलो. नांदेडला असताना रिझल्ट दिवशी माझे आजोबा, मोठेबाबा यायचे. आणि विचारायचे "कितवा नंबर आला?". दरवर्षी प्रमाणे मी उत्तर द्यायची "दुसरा". "बरं, मग पहिल्या नंबरच्या बक्षीसात आणि तुझ्या बक्षीसात कितीचा फरक आहे?" मी सांगायची जो काय फरक असेन तो.. मग आजोबा तो फरक त्यांच्याकडून बक्षीस म्हणून भरून काढायचे. असो! औरंगाबादला शिफ़्ट झाल्यावर मग रिझल्ट दिवशी "कोण येणार गं?" असं मी आईशी मोठेबाबांची आठवण आली म्हणून बोलत होते. आमचं बोलणं चालूच होतं तो कोणी तरी आलं म्हणून आईनं दार उघडलं. ६ फुट उंच, सडसडीत, आणि फ्रेश पर्सनालिटीच्या व्यक्तीला मी पाहिलं. "अरे! या नं हेमंत!" असं म्हणत आईनं त्यांना आत घेतलं. त्याचं बोलणं झाल्यावर मोर्चा माझ्याकडे वळला. "मग? काय रिझल्ट लागला?" आणि आश्चर्य म्हणजे मी वर्गात पहिली होते. मग मी तसं सांगितल्यावर मला म्हणे," तुला काय बक्षीस देऊ?" मी चाटच पडले.. आता यांना काय सांगू म्हणून? मग काकाच म्हणाले,"चल आईसक्रीम देतो तुला." मी आणि माझी बहीण आम्हा दोघींना बाईकवर बसवून काकांनी आईसक्रिमच्या दुकानात नेलं आणि टूटीफ्रूटी आइसक्रिमची एक अख्खी ब्रिक गिफ़्ट दिली. आणि जोवर आम्ही औरंगाबादला होतो ती आठवर्ष ती आइसक्रिमची ब्रिक दरवर्षी न चुकता आम्हाला रिझल्ट्चं बक्षीस म्हणून मिळाली....

माझ्या लग्नाच्या आसपास हेमंतकाका ऍक्सिडेंटमध्ये वारले. तन्मयचा यावर्षी पहिला रिझल्ट होता. हेमंतकाका... तुमची आठवण आली. आम्ही दिलं त्याला आईसक्रिम... त्याला तसाच आनंद झाला होता जसा आम्हाला व्हायचा... आणि हो! जसं तुम्हाला हसू यायचं ना.. तसंच हसू आम्हाला ही आलं... तुम्ही असायला हवे होता त्याचं कौतुक करण्यासाठी...


Thanks kaka for ur icecreams!!! I missed them this time.... for tanmay...

27 March 2009

पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!

सर्वांना मराठी नव वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा

सोनल
गोपाळ
तन्मय!

22 March 2009

उज्ज्वला

तसं पाहिलं तर आज उज्वलाची आठवण येण्यासाठी तसं काही विशेष कारण घडलं नाही... चित्रा, आणि तिची फॅमिली दुपारी घरी आली होती... सहजच काकूंशी बोलत होते... त्यांच्या भागात राहणार्‍या MGM च्या, माझ्या कॉलेजच्या मुलींबद्दल... आणि बोलता बोलता त्यांनी घेतलेल्या नावांमध्ये तेलंग नाव आलं. "म्हणजे उज्वला ना?" माझ्या तोंडून निघून गेलं... त्या काहीच बोलल्या नाहीत... होकारार्थ फक्त मान हलवली... "कोण गं?" चित्राच्या या प्रश्नावर "माझी कॉलेजची मैत्रीण.. ती आणि मी प्रोजेक्ट पार्टनर्स होतो" मी येवढंच म्हणू शकले... "मग?" "मग तिचा ऍक्सिडेंट झाला कॉलेजमधून घरी वापस येताना. फायनल ईयर क्लिअर केल्यावर... ती ऑन द स्पॉट गेली." thats it. मी पुढे काहीच बोलू शकले नाही. आणि खुप खुप दिवसांनी तिच्या आठवणींनी डोळ्यात आलेलं पाणी मी पापणीपर्यंत पण येऊ दिलं नाही. It was hard, very hard to control... Very difficult to stop me from remembering her memories... असं का झालं हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येत राहीला. काकू सांगत होत्या, "ती गेल्यापासून तिची आई फारशी कोणात मिक्स होत नाही." ahh that was another hard sentense to hear. कधी वाटतं ती गेली या ऍक्सिडेंट मध्ये ते चांगलं झालं नुसता हात पाय तुटून लुळी पांगळी जगण्यापेक्षा ती निदान गेली तरी. जाणारा माणूस जायचं तेंव्हा जातो. पण हाल न होता जाणं खुप कमी जणांच्या नशीबी असतं. उज्वला हाल न होता गेली... पण मला बाय न म्हणता... आम्हा कोणालाच बाय न म्हणता.... तिच्या मैत्रीणींना पण!

देव आहे ना जगात??? मला एक मागणं आहे देवाकडे.. थोडं फिल्मी आयुष्य होऊ दे ना.. जिचा ऍक्सिडेंट झाला ती उज्वला नसावी आणि कोणीतरी दुसरं असावं... उजू दुसरीकडे कुठंतरी सेफ असावी.. आणि अचानक समोर यावी.. "हाय सोनल" म्हणत... I will hug her tight and will ask her not to go away from us...

21 March 2009

लहान मुलाचं हसू :-)) मस्तच आहे



फाल्गुनी पाठकचं हे गाणं मस्तच आहे! यात काही शंका नाही... पण या रीमिक्स मध्ये घेतलेलं लहान मुलाचं हसू त्याहूनही मस्त आहे!!! पूर्ण गाणं ऐकल्यावर मी मात्र खुप एंजॉय केलं...

15 March 2009

भाषा

नवीन गोष्ट लिहावीशी वाटतेय... प्लॉट तयार करावासा वाटतोय.. पण मला ना टॉपिक सुचत नाहिये कथेसाठी. ह्म्म.. बघू कोणी प्रतिक्रियेत सुचवतं का एखादा स्टोरी लिहिणेबल टॉपिक... लिहिणेबल वरून लक्षात आलं... माझी भाषा जरा चेंजत चाल्लीये... म्हणजे बदलत चाल्लीये.. करणेबल, खाणेबल, मी थिंकतीये.... मी सिंगतीये... मी वॉकतीये... मी कुकतीये... हा हा हा हा.. OMG.. कसली भन्नाट भाषा बोलतीये मी गेल्या १ २ महिन्या पासून.. आणि गम्मत म्हणजे तन्मय पण बर्‍यापैकी पिकतोय (पिक करतोय) ही भाषा... तो एक दिवस माझ्या पप्पांना म्हणाला.."आजोबा एक मिनिट थांबा मी थिंकतोय.. थिंकून झालं की सांगतो तुम्हाला..." मी चाटच पडले...

जरा चेंज म्हणून ही भाषा बरी वाटते. Not for serious studd though! असो! टॉपिक सुचतोय का काही?? टेला मला...

14 March 2009

रोहीत राऊत - अबीर गुलाल उधळीत रंग



अबीर गुलाल उधळीत रंग हे माझ्या अनेक अनेक आवडत्या मराठी गाण्यांपैकी एक. सर्वत्र शोध घेत माझं हे गाणं कायम ऐकणं सुरू असतं. सवयीनं युट्यूबवर मी शोधलं. तिथे रोहीत राऊतच्या गाण्याची लिंक मिळाली. माननीय तौफिक कुरैशी यांच्या उपस्थितीत झालेल्या झी मराठीच्या चिल्ड्रन्स स्पेशलच्या एका एपिसोड मध्ये त्यानं गायलेलं हे गीत. जनरली गाणं जेंव्हा मी ऐकते तेंव्हा मोडक्या आणि फुटून पार मोडलेल्या आवाजात मी ही गाणं गुणगुणते. पण रोहितचं हे गाणं ऐकताना मला इतर कोणाचा आवाज ऐकू ही आला नाही. त्याच्या शब्दांचं उच्चारण, स्टेजवरचा आत्मविश्वास, आणि त्याचा लागलेला सूर! मस्त झालं गाणं. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन... रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन... या दोन ओळींना लागलेला त्याचा आवाज मस्त आहे. "जातीहीन" शब्दातलं त्याचा "ज" चा उच्चार "जात नाही ती जात" यातील "ज" सारखा नाही तर "जीवन सुंदर आहे" मधील "ज" सारखा झालाय... तो भाव खाऊन गेला! रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ही ओळ म्हणताना तो खरचं त्या मध्ये लीन झालेला भासतो. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग.. नाथाघरी नाचे माझा सखा पांडूरंग या ओळींना घेतलेल्या हरकती आणि छोटीशी तान आहाहा असं म्हणायला मला तरी भाग पाडते.

जिओ रोहीत! खुप पुढे जा... तुझ्या वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

~ सोनल

26 February 2009

बालपणीचा उन्हाळा सुखाचा

आज दुपारी कधी नाही ते मी बाल्कनीचा पडदा उघडला आणि डोळे बाहेरचं उन बघून गच्च बंद झाले. अजून फेब्रूवारीपण संपला नाहीये आणि उन जाणवायला लागलयं. टिंग टिंग टिंग गाडीची घंटीपण अगदी मोक्याच्या क्षणी वाजली. माझं लहानपण आठवलं. आम्ही नांदेडला होळीवर जायचो. ते माझं आजोळ.. खाला नावाची एक बाई तिथं आमच्या दाराच्या बाजूलाच दुकान लावून बसलेली असायची. तिच्या टोपलीत त्या त्या ऋतूची फळं नक्की असायची. आणि बिनधास्त डोळे मिटून कुठलं ही फळ उचला तिच्या टोपलीत खराब फळं नसायची. तिच्यापासून ५ १० फुटांवर कुल्फीवाला उभा असायचा. जाड, ओला, लाल रंगाचा कपडा झाकलेली त्याची कुल्फीची कुलींग सिस्टीम एकदम जबरदस्त होती. तो आला तिथे की मग त्याच्या ढकलगाडीची घंटी वाजवायचा आणि "य कुल्फ्यल्य" अशी मस्त साद घालायचा. आजोळी, आमच्या वाड्यात सगळे मिळून ४ कुटूंब गुण्या गोविंदानं रहायची. या कुल्फीवाल्याची साद ऐकली की चारही घरातून लहान लहान डोकी बाहेर यायची आणि मग तिथं आम्ही कुल्फी घ्यायचो. आज फ्लॅट सिस्टीम मध्ये असा कुल्फीवाल्याचा गाडा दिसतच नाही. जेंव्हा आज गाडीची घंटी वाजली तेंव्हा वाटलं एक कुल्फी विकत घेऊन रस्त्यावर उभं राहून खावी.

बरं हे झालं कुल्फीचं.. आंब्याचा रस??????? आहाहा! लोह्याला आम्ही जायचो.. माझे आजोबा गोटी आंबा आणायचे शेतावरून येताना.. मग आमची आई किंवा माझी मोठी काकू - आशा काकू, रस करायची... आम्ही सगळी नातवंड आणि समोर आजोबा अशी पंगत बसायची.. चला माझ्याशी शर्यत लावता का रस खाण्याची? आजोबा विचारायचे मग त्यांच्याशी शर्यत लावत आम्ही रस खायचो. सकाळचे आंबे वेगळे, संध्याकाळचे वेगळे असायचे.. सकाळी केलेला रस संध्याकाळी पुन्हा यायचा नाही! हा हा हा! संपलेला असायचा सकाळीच! दुपारपर्यंतही रहायचा नाही.. रात्र तर दुर राहीली!

आज लहानपणचा उन्हाळा आठवतोय. तन्मयच्या पहिल्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होतील... आत्ता कुठे त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या.. मग ती धमाल, सगळ्या भेटी.. पण तो मोठा झाल्यावर त्याला आपल्या सारखं आठवेल हे सगळं?

13 February 2009

अलेपी.... God's Own Country!!!!

"या वर्षीची वार्षिक ट्रिप कुठे काढायची गं?" हे वाक्य पूर्ण व्हायचा अवकाश की मी पट्कन म्हणाले.. "केरळ".. यांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उठली!... "७ फेब्रूवारीची तिकीटं बुक केलीयेत... तयार आहेस ना?" मी तयारीला लागले.. मिनीमम पॉसिबल लगेज आणि कॅमेरा, चार्जर, मेमरी चिप, आणि आय पॉड विथ स्पीकर्स आमची ट्रॅव्हल बॅग तयार झाली. ७ तारखेला कोचीनला पोहोंचलो.. तिथून अलेपीला जाणार होतो. साधारण २ तासांचा ड्राईव्ह आहे. अलेपी जसं जसं जवळ येत होतं तसा हवेतला बदल जाणवत होता. खुप फ्रेश वाटत होतं. केरळमधील सर्वात मोठं तळं वेंबनाडू. तिथं आम्ही बोट हाऊस बुक केलं होतं. वेंबनाडू लेकचे हे काही फोटोज तुमच्या साठी...









शांत वातावरण, माझ्या आवडता मावळतीचा सूर्य... मला मावळतीचा सूर्य आवडतो. प्रचंड आवडतो.. व.पू. काळेंचं एक वाक्य आठवतं "आजचा सूर्य मावळल्या शिवाय उद्याचा सूर्य येत नाही... कदाचित म्हणून ही मला मावळतीचा सूर्य आवडत असावा." जेंव्हा कधी मी मावळतीचा सूर्य बघते मला वपूंची कोटेशन्स आठवतात. असो!

बोट हाऊसवरचा आमचा अनुभव स्मरणीय आहे. बोटीवरचे सगळेच क्रू मेंबर्स चांगले होते. तिथली स्वच्छता, मदत, आदरातिथ्य आणि तत्परता ५ पैकी ५ गुण घेऊन गेली. आम्हाला सर्व्ह केलेलं हे अननस...



रात्री बोटीवर एकदम आजोळी गावी राहिल्या सारखं वाटत होतं. मोकळी आणि स्वच्छ हवा, गरम गरम जेवण, आणि जेवण झाल्यावर कित्येक वर्षांनी मारलेल्या निवांत मोकळ्या गप्पा... आहाहा.. बालपण पुन्हा मिळाल्यासारखं वाटत होतं. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत लोह्याला जायचो... आजोबांसोबत जेवणं झाली की मग आम्ही असंच त्यांच्या बाजेजवळ बसून त्यांच्याशी खुप वेळ गप्पा मारायचो... बोट एका बेटाजवळ किनार्‍याला थांबलेली रात्री. जेवणं झाल्यावर बोटीवरचे लाईट्स बंद केले गेले. आम्ही दोघं खिडकी जवळ उभे होतो... "ए सोनल.... तुला जमीनीवरचे तारे बघायचे???" मी तिकडे बघितलं तर असंख्य काजवे चमकत होते. खरोखर जमिनीवर तारे आले असावेत असं वाटत होतं. रात्री एक काजवा आमच्या खोलीत आला होता. तन्मयनी पहाटे पहाटे पाहिला आणि उत्सुकतेनं तो ही म्हणाला, "पपा, रात्री आपल्या खोलीत एक स्टार आला होता. मी पाहिला त्याला...."

सकाळी ब्रेकफ़ास्ट झाल्यावर आम्ही नावेत एक चक्कर मारली. आमचे हे आणि पुत्ररत्न दोघांनी नाव वल्हवली. पोल्युशनचा गंधही नसलेलं अलेपी सोडायची वेळ जशी जशी जवळ येत होती तसं शाहरूख खानचं एक गाणं आठवत होतं....

ए वक्त रुक जा, थम जा ठहर जा...
वापस जरा दौड पिछे....

अलेपी सोडावसं वाटत नव्हतं.... कधीही न विसरता येणारा निसर्ग आणि अतिथी देवो भव या उक्तीला १००% सार्थ ठरवणारं आदरातिथ्य घेऊन आम्ही वेलिंग्डन बेटाकडे रवाना झालो..

03 February 2009

राहूल!!!

इंजिनियरिंगला नांदेडला नंबर लागला आणि मग मी ग्रुपच्या शोधात लागले. "अरे सोनल, आपण एकाच कॉलेजला आलोत!!!" माझी ऍडमिशन झाल्यावर पहिलं जर कोणी माझ्या कॉलेज मधून बोललं असेल तर तो राहूल!!! "आता मजा येईन... तू आणि मी कॉलेज मध्ये धिंगाणा घालू आणि सगळ्यांच्या नाकी नऊ आणू...." आणि काय काय राहूल बोलत होता आणि मी मोठ्ठा आ वासून त्याच्या कडे बघत होते. पपा माझे दोन्ही काका मी राहूल आम्ही सगळे बैठकीत बसलेलो. इतकं बिनधास्त बोलणं राहूललाच जमू जाणे... राहूल कंट्रोलच्या बाहेर बोलतोय असं लक्षात आल्यानं म्हणा किंवा अजून काही कारण असो... "चला आता पुस्तकं आणा आणि अभ्यासाला लागा... " असं म्हणत आदरणीय प्रभूतींनी ऍडमिशन बैठक आवरली... राहूल मित्रांसोबत बाहेर गेला आणि मी काकू सोबत आत घरात.

राहूल माझा चुलत भाऊ. आमच्या वयात जेमतेम ४ महिन्यांचं अंतर. एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व... मित्रांमध्ये रमणारा, सगळ्यांसोबत असूनही आपलं वेगळेपण जपणारा. "ए काय हे? हे बरोबर नाही.." समोर कोणीही असो आपलं म्हणणं ठणकावून मांडणारा, एखादा मुद्दा कळला नाही तर बिनधास्त डाउट्स विचारणारा राहूल मनात कोणाविषयी ही आकस न ठेवणारा मुलगा... राहूलचा पुढे मेडिकलला नंबर लागला. नांदेडहून तो औरंगाबादला गेला. तो होता तोपर्यंत मला एक सॉलिड सपोर्ट होता. काका काकू जेंव्हा कधी औरंगाबादला जायचे त्यावेळी त्याला मी काही ना काही तरी पाठवायचे. कधी छोटं मोठं पत्र तर कधी एखादी हलकी फ़ुलकी गिफ़्ट. पुढे ते ही कमी झालं. पण त्याची पोच यायची.

MBBS झाल्यानंतर त्यानं न्युरोसर्जरीत स्पेशलायझेशन केलं आणि सध्या पेडीयाट्रिक सर्जरीत सुपर स्पेशलायझेशन करतोय. ५ - ६ महिन्यांपूर्वी राहूलची एक धावती भेट झालेली. तो तिरुपतीहून मणिपालला वापस जात होता त्यावेळी बेंगलोरला माझ्याकडे आला होता. अगदी तासभर होता पण खुप दिवसांनी भेटलो होतो. बरं वाटलं. आम्ही मणीपालला त्याच्याकडे गेलो होतो. दोन दिवस खुप मजेत गेले. जुन्या आठवणी, जुन्या गप्पा, जुने विषय... एक ग्राफिटी आठवली आणि १००% पटली... शिळोप्याच्या गप्पा केल्या की ताजंतवानं वाटतं! तशीच ताजीतवानी होऊन मी बेंगलोरला परतले.

02 January 2009

ग्लोबल वार्मींग!

मी साधारण ११वी १२वी ला असेन, गणपती उत्सवानंतर,पाऊस कमी व्हायचा. मग हळू हळू थंडी पडायची. सप्टेंबर नंतर आणि ऑक्टोबरच्या सुरूवातीला स्वेटर्स, कानटोप्या, मफ्लर्स, ग्लोव्ज, गरम शाली असा थंडीचा लवाजमा वरच्या बॅगमधून बाहेर यायचा. डांबरगोळ्यांचा छान वास असायचा त्यांना. मग एकदा उन्हात ठेवून त्यांना धुतलं जायचं. सकाळच्या ट्युशनच्या वेळी आई मागं लागायची, "स्वेटर घाल गं बाहेर थंडी आहे." मग गरम पाण्यानी अंघोळ झाली तरी बाहेर खूप थंडी वाजायची. स्वेटर, मफ्लर, ग्लोव्ज आणि दोन जोड्या सॉक्स असा गरमागरम सरंजाम असला की थंडीची काय टाप आमची आणि सर्दीची गाठ घालून द्यायची? ऑक्टोबरची विचित्र गरमी आणि डिसेंबर ते फेब्रूवारीची मस्त थंडी असे चार महिने काय छान जायचे आमचे! आई छान सूप करायची, रात्री जेवणाला सार आणि खिचडी, तुप मेतकूट भात, पिठलं भाकरी भरल्या वांग्याची भाजी भरीत भुरका मिरचीचा ठेचा...

आहाहा! काय दिवस होते ते! साधारण माझ्या लग्नापर्यंत हा ग्लोब वार्म झाला नव्हता पण त्याची प्रोसेस सुरू झाली होती हे नक्की! डिग्रीला पावसाळा ऑगस्ट्मध्येच बाय म्हणायला लागला होता. सप्टेंबर कोरडा जायचा. ऑक्टोबरमध्ये कडक उन पडायचं पण थंडीचा मागमूस पार त्याच्या एंडला लागायचा. मग नोव्हेंबर मध्ये थंडी पडायची. आणि ही थंडी फेब्रूवारी मिड पर्यंत कॅरी ऑन व्हायची. नंतर उन्हाळा... माझी आई म्हणायची सात जूनला मॉन्सून नक्की येतो. जूनमध्ये फॉर शुअर एंट्री मारणारा हा मॉन्सून हळू हळू लेट कमर व्हायला लागला. तो ७ जूनच्या ऐवजी १० जून, १४ जून करत करत आता जुलै मध्ये दाखल व्हायला लागलाय. सप्टेंबर एंड पर्यंत पाऊस बाय म्हणतोय. मग ऑक्टोबरची कोरडी गरमी नोव्हेंबर ते यावर्षी तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिली. यंदा २००८ मध्ये थंडी फक्त जानेवारीत पडली असावी. म्हणजे २००८च्या पहिल्या महिन्यात. नंतर ती पडलीच नाही. मी पुण्याला १५ डिसेंबर २००८ ला आले. आज २ जानेवारी २००९ आहे. आणि थंडी ३१ डिसेंबर २००८ला जाणवली. हे सगळं काय सांगतं? हे का होतंय? अंटार्क्टिकाचा बर्फ वितळतोय. तो संपूर्ण वितळला की समूद्राची पातळी वाढेल. जशी द्वारका समूद्रात बुडाली तशी आपली आमची मुंबईपण समूद्रात बुडून जाईल. याला काही सोल्यूशन आहे??? उन्हाळ्यातली गरमी ४७ ४८ डिग्रीपर्यंत पोहोंचलीये. पावसाळा कमी झालाय. हिवाळ्याचा काळ कमी झालाय. उन वाढतय. जसं आज मी म्हणतेय की माझ्या ११वी १२वी पर्यंत तसं तन्मयही काही काळानं म्हणेन.. माझ्या लहानपणी जानेवारी ते फेब्रूवारी असा २ महिने हिवाळा असायचा. आणि माझ्या विचाराची हद्द म्हणजे तो म्हणेन मी पावसाळा डॉक्युमेंटरीत पाहिलाय...

पृथ्वी तापतेय! तिला थंड ठेवणं शक्य नाहिये पण किमान तिचा तापण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न तर व्हायला हवा ना!