02 January 2009

ग्लोबल वार्मींग!

मी साधारण ११वी १२वी ला असेन, गणपती उत्सवानंतर,पाऊस कमी व्हायचा. मग हळू हळू थंडी पडायची. सप्टेंबर नंतर आणि ऑक्टोबरच्या सुरूवातीला स्वेटर्स, कानटोप्या, मफ्लर्स, ग्लोव्ज, गरम शाली असा थंडीचा लवाजमा वरच्या बॅगमधून बाहेर यायचा. डांबरगोळ्यांचा छान वास असायचा त्यांना. मग एकदा उन्हात ठेवून त्यांना धुतलं जायचं. सकाळच्या ट्युशनच्या वेळी आई मागं लागायची, "स्वेटर घाल गं बाहेर थंडी आहे." मग गरम पाण्यानी अंघोळ झाली तरी बाहेर खूप थंडी वाजायची. स्वेटर, मफ्लर, ग्लोव्ज आणि दोन जोड्या सॉक्स असा गरमागरम सरंजाम असला की थंडीची काय टाप आमची आणि सर्दीची गाठ घालून द्यायची? ऑक्टोबरची विचित्र गरमी आणि डिसेंबर ते फेब्रूवारीची मस्त थंडी असे चार महिने काय छान जायचे आमचे! आई छान सूप करायची, रात्री जेवणाला सार आणि खिचडी, तुप मेतकूट भात, पिठलं भाकरी भरल्या वांग्याची भाजी भरीत भुरका मिरचीचा ठेचा...

आहाहा! काय दिवस होते ते! साधारण माझ्या लग्नापर्यंत हा ग्लोब वार्म झाला नव्हता पण त्याची प्रोसेस सुरू झाली होती हे नक्की! डिग्रीला पावसाळा ऑगस्ट्मध्येच बाय म्हणायला लागला होता. सप्टेंबर कोरडा जायचा. ऑक्टोबरमध्ये कडक उन पडायचं पण थंडीचा मागमूस पार त्याच्या एंडला लागायचा. मग नोव्हेंबर मध्ये थंडी पडायची. आणि ही थंडी फेब्रूवारी मिड पर्यंत कॅरी ऑन व्हायची. नंतर उन्हाळा... माझी आई म्हणायची सात जूनला मॉन्सून नक्की येतो. जूनमध्ये फॉर शुअर एंट्री मारणारा हा मॉन्सून हळू हळू लेट कमर व्हायला लागला. तो ७ जूनच्या ऐवजी १० जून, १४ जून करत करत आता जुलै मध्ये दाखल व्हायला लागलाय. सप्टेंबर एंड पर्यंत पाऊस बाय म्हणतोय. मग ऑक्टोबरची कोरडी गरमी नोव्हेंबर ते यावर्षी तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिली. यंदा २००८ मध्ये थंडी फक्त जानेवारीत पडली असावी. म्हणजे २००८च्या पहिल्या महिन्यात. नंतर ती पडलीच नाही. मी पुण्याला १५ डिसेंबर २००८ ला आले. आज २ जानेवारी २००९ आहे. आणि थंडी ३१ डिसेंबर २००८ला जाणवली. हे सगळं काय सांगतं? हे का होतंय? अंटार्क्टिकाचा बर्फ वितळतोय. तो संपूर्ण वितळला की समूद्राची पातळी वाढेल. जशी द्वारका समूद्रात बुडाली तशी आपली आमची मुंबईपण समूद्रात बुडून जाईल. याला काही सोल्यूशन आहे??? उन्हाळ्यातली गरमी ४७ ४८ डिग्रीपर्यंत पोहोंचलीये. पावसाळा कमी झालाय. हिवाळ्याचा काळ कमी झालाय. उन वाढतय. जसं आज मी म्हणतेय की माझ्या ११वी १२वी पर्यंत तसं तन्मयही काही काळानं म्हणेन.. माझ्या लहानपणी जानेवारी ते फेब्रूवारी असा २ महिने हिवाळा असायचा. आणि माझ्या विचाराची हद्द म्हणजे तो म्हणेन मी पावसाळा डॉक्युमेंटरीत पाहिलाय...

पृथ्वी तापतेय! तिला थंड ठेवणं शक्य नाहिये पण किमान तिचा तापण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न तर व्हायला हवा ना!

3 comments:

प्रभाकर कुळकर्णी said...

all your posts are always excellent. i like going through it. you have talent .

Sonal said...

Thank you very much sir. :-) I just write what comes in mind. yet a lot to achieve. Talent still to explore!

prajkta said...

lavkarach yet aahe.....