13 September 2008

दिल्लीचे ब्लास्ट्स..

संध्याकाळी सहजच रेडिफला गेले होते. दिल्लीला ४ ब्लास्ट्स झाल्याची बातमी पहिली आणि ठळक होती. बेंगलोरचे ब्लास्ट होऊन २ महिने ही पुरते झाले नाहीत तो हे दिल्लीचे ब्लास्ट्स... १०० पेक्षा जास्त घायाळ आणि १४ जणांचा मृत्यु.... काय मिळालं त्या लोकांना ज्यांनी हे बॉम्ब्स ठेवले? ना मरणार्‍या लोकांशी त्यांचा काही संबंध ना घायाळ लोकांशी... वीक एंडचे किती तरी प्लान्स घेऊन बाहेर पडलेले लोकं... कोणाची आई, कोणाचे वडील, कोणी मित्र... कोणी नातलग... कोणी जवळचे कोणी परिचित... का हे होतयं? याला काही उत्तर आहे? टि.व्ही बघताना जिकडे तिकडे पडलेला रक्ताचा सडा, रडवेले लोकं, कोणाचं मुल हरवलय.. कोणाच्या अजून नातेवाईकांचा पत्ता लागला नाही.. ह्या अशा वगणूकीने कोणी काही मिळवलय का?
रिगल सिनेमा जवळ एक जिवंत बॉम्ब सापडला. हा बॉम्ब फुटला असता तर मृतांची संख्या अजून वाढली असती आणि घायाळांची पण.... बातम्या बघता बघता सहजच मनात आलं एक दिवस देवाला मागणं घालावं... " देवा, अशी शक्ती दे की या सर्व नक्षलवाद्यांच्या, आतंकवाद्यांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना हिप्नॉटाईज करून त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणावा.... "
देवा... प्लिज काही अवतार घेऊन ये ना परत पृथ्वीतलावर... आम्हाला तुमची गरज आहे. गणपती बाप्पा, तुम्ही विघ्नहर्ते आहात... संकटमोचक आहात... आम्हा सर्वांना मदत करा ना... प्लिज...

व्यथित
सोनल