19 February 2011

Gone are those days!

We had shifted to Bangalore, Whitefield. Basically shifted for short time and as per joining conditions, we were supposed to move to Singapore. We had not taken major stuff with us. Thankfully there was no TV, Neither we had taken any kind of music system with us. We just had a small radio at home. Does that feel like living in early years of 1900 century??? But we lived like that for about 8 short months. Yeah! That was a short time span of my life. We spent time together with each other. Gave ample time to Tanmay, we shared talks and some nice evening chit-chats. Since there was no TV, while having meals, we used to crack jokes and have good time. We went out for walk. We went to park with Tanmay. We used to give time to Tanmay and even each other.

Later we purchased TV, we took that tata sky's DTH connection and this golden period came to an end. We stopped going out in evening, Tanmay's play time slowly moved towards watching TV and sitting idle. There started argument for getting charge of remote control to watch movies and cartoons and songs and all.. Meal time chit chats came to an end. Evening walk ended in front of TV watching some boring and irritating movie and serials.

TV definitely is a boon... but not at the cost of family time. Entertainment must be there. Everyone needs some relaxed time but it can be achieved with family and kids too. Spending quality time with them. Sharing jokes, some childhood stories, some information, reading some book and sharing its info.... lot of things are there which can give entertainment with family life. TV has taken it all away from me. Sometimes I really feel to dump TV in some dirty corner and spend quality time together with family.

31 December 2010

सहजच

बघता बघता रोहन ७ महिन्यांचा झाला. आणि जाणवलं की अरे.. तन्मयही ७ वर्षांचा झाला. दिवस कसे भराभर मागे पडले. दोन महिन्यांचा छोटासा तन्मय... मानही बसली नव्हती त्याची. त्याला घेऊन चेन्नईला गेले होते. त्याला वाढवताना आलेली मजा आठवली. जरा जोरात रडला की काय झालं असेन असा विचार मनात यायचा आणि भिती वाटायची. मग डॉक्टर कडे पळत जायचो.. मला आठवतय! अचानक तन्मय रडायला लागला म्हणुन रात्री दीड वाजता आम्ही त्याला घेऊन २० कि.मी. दुर मालार हॉस्पिटल मध्ये गेलेलो.. आणि तिथे जाई पर्यंत तो रडायचा थांबला. डॉक्टर म्हणाले "Nothing special. Its gases that cause the stomach pain and kids cry till they pass gas out." आम्ही दोघं गप्प!

दिवस मागे पडले. तन्मय पडो झडो माल वाढो या उक्तीप्रमाणे वाढला. कधी प्रेमाने, कधी चिडत, कधी रडत... हळू हळू समज देत समजून घेत तो वाढला. रोहन झाला तेंव्हा असं वाटलं की तन्मयचा अनुभव जसा होता तसाच रोहनचा पण असेन. पण त्या दोघांमध्ये खुप तफावत आहे. तन्मय शांत आणि समजदार तर रोहन तडतडा आहे. तन्मय पटापट जेऊन घेतो तर रोहन patience बघतो. तन्मय शांत आणि निवांत तर रोहन चपळ आणि चंट. दोन बाळं एक सारखी नसतात हेच खरं.. हे उमगलं आणि पटलं सुद्धा.

त्याचे खेळ बदलले, अभ्यास सुरू झाला, बडबड बदलली, over the period तो अजून बदलत जाणार... आणि त्याला बघत रोहनही वाढणार.

पाळण्यात निवांत पहुडलेलं, सुती दुपट्यात स्वतःला गुंडाळून घेत जगाचा अंदाज घेणारा रोहन आता रांगायला लागलाय. हव्या त्या वस्तूकडे सरपटत जाणं, पकडून आपटणं, आवाज ऐकणं, चिरकणं, ओरडणं, आणि मला घ्या अशा अर्थाचं लोभसवाणं हसणं.... सगळं किती छान आहे ना!

खरचं... किती सुंदर आहे वाढणं आणि वाढवणं.


सोनल

16 December 2010

कधी तरी येशील का?

बर्‍याच दिवसांनी निवांत खिडकीत बसले होते. हलणारी पानं बघत नजर शून्यात कधी स्थिरावली कळलंच नाही. उज्ज्वलाची आठवण आली. १० वर्ष झाली तिला जाऊन. मानदाचा फोन आठवला. आईनं "काय झालं गं?" असं विचारलेलं आठवलं. कधी वाटत उजू जायला नको होती. ती त्या दिवशी बाहेर पडायलाच नको होती. कधी मी स्वतःशीच भांडते की मी का नव्हते तिच्या सोबत. कधी वाटतं की असं का नेलं असावं तिला? ती चांगली होती. सरळ साधी नाकापुढे चालणारी. 'भातुकलीच्या खेळांमधली' गाणं आवडणारी. ती गेली त्यानंतर मी हे गाणं गुणगुणनं सोडून दिलं. तीची आठवण येते मग. हसणं, सोबत येणं...

भगवद्गीता सांगते की पुनर्जन्म आहे. मग उजू पुन्हा आली असेन का? जन्म घेऊन कधी माझ्या समोर पुन्हा आली तर जुना ऋणानुबंध जुळेल का? आम्ही ओळखू का? माझी मैत्रिण म्हणून ती पुन्हा येईल माझ्या आयुष्यात??? ये गं परत, खरच ये. तुझी आठवण येते.

उद्या नांदेडला जायचय. जिथे तिचा ऎक्सिडेंट झाला त्या रस्त्यावरून जाईन मी. खुप वेगवेगळ्या feelings मनात येत आहेत. एकटं वाटतय..

01 November 2010

कर्मबंध म्हणजे काय?

जीवन सुखोपभोगात घालवावे या साठी अनेक जण परीश्रम करतात. आपले कर्म करतात. हे कर्म महत्वाचे असते का? नाही. हे कर्म महत्वाचे नाही, तर कुठलं ही काम करताना, कर्म करताना 'बुद्धी कशी आहे?' हे महत्वाचं. याला योगबुद्धी म्हणतात. योग बुद्धीनं "कर्मबंधाचा" नाश होतो. कर्मबंध म्हणजे बंधनकारक कर्म. जसं कर्म असेन तसं फळ मिळतं. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळणार. जणू कर्म म्हणजे बीज!! बीज जर चांगलं असेन तर त्यातून निघणारं झाड चांगलंच निघतं. चांगल्या झाडाला चांगलं, निरोगी फळ लागतं. आणि निरोगी फळाचं निपजणारं नवीन बियाणंही कायम निरोगी येतं. हे एक चक्र आहे. आणि या चक्रात कायम भ्रमंती सुरू असते.
काही वेळा कर्म करताना मनःस्वातंत्र्य मिळत नाही. अशा वेळी कर्मे मना विरूद्ध करावी लागतात. उदाहरणा दाखल सांगायचं झालं तर, संतप्त जमावाला पांगवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यानं दिलेला लाठीमाराचा आदेश एक पोलिस शिपाई पाळतो. शिपायाला वाटत असेन की लाठी मारू नये. पण केवळ वरिष्ठांच्या आदेशापोटी तो लाठी चालवतो. हे ही कर्मबंध आहे. मी बघत नाही... मला बघावं लागतं. मी करत नाही.... मला करावं लागतं. हे सगळं कर्मबंध, पण याला कर्मस्वातंत्र्य नाही.
नैसर्गिक वृत्तीतून केलेली कामं हे जीवन असलं तरी हे चाकोरीतील जीवन. चाकोरीबद्ध जीवन. या नैसर्गिक वृत्तीच्या बाहेर पडणं ही मुक्तता. चाकोरीबद्ध जीवनात घडलेली कर्म "झाली" म्हणता येतात. "केली" म्हणता येत नाही.
कुठलंही कर्म करताना "बुद्धीची मुक्तता" ही कर्मबंधनाच्या विरुद्ध स्थिती आहे. त्यामुळे स्वधर्म पाळताना ते मुक्तबुद्धीनं करणं हे महत्त्वाचं. त्याशिवाय "स्वधर्माचरण केलं" असं म्हणता येत नाही. कर्म करताना बुद्धी मुक्त आहे की नाही हे महत्त्वाचे ठरते. स्वधर्माचं आचरण आणि कर्मफलाचा त्याग हे कर्मबंध!!!

भगवद्गीता अध्याय - २

16 May 2010

Another memorable day of my life ~ 2 - 6 - 2010



2nd June 2010... fine morning at 6.30.. I was in OT at Gupte Hospital.. This is pulse and BP moniter, this is saline to keep you hydrated.... sisters in OT room were telling me and I was like hmm hmm and hmm.. humming all the way.. little tense, little anxious and little worried about whats gonna happen in next few minutes. Anaesthetist came in asked me to sit and injected anaesthesia in my spine. Said "now your lower lumbar region wont feel senses although you will notice movements around you and you will hear what we are talking." Sr. Doc came in OT looked at me while I was given anaesthesia and said," Dont worry everything is gonna be alrite." Nurse helped me in resting myself on the table and then it was all handed over to docs. I cud feel doc opening my stomach... I heard him saying "NOW PUSH" and I cud notice the other doc pushing... I heard crying.... My baby cried... immediately after birth... moment of joy happiness and moment of anxiety of knowing about baby whether all well or no... It was a feeling... Feeling of being mom... once again.. Doc said,"Congratulations mother... its a baby boy!" I dont remember what was my reaction. He then added," there are two loops of cord around his neck. But he is alrite." and then he went out. Nurse cleaned up baby.. kept him in warmer for 10 15 mins and then baby was handed over to my family. Everyone was happy to see the little angel. specially Tanmay.... for him being elder bro... the Dada of the little one.. caring loving and papmering him thru't his life..

God bless both little souls at my home...

16 March 2010

आईच्या हातची चव

रोजच्या आयुष्यात घडणार्‍या अनेक छोट्या छोट्या गोष्टी. आठवणींच्या कोपर्‍यात कोण साद घालेन सांगता येत नाही. शाळेत असताना अनेकदा माझी आई तुप साखर पोळीचा लाडू करून द्यायची. कधी नाश्त्याला तर कधी चार साडेचारच्या मधल्या खाण्यासाठी. अगदी जुनी गोष्ट नाही. कालच दुपारी तुप साखर पोळी खावीशी वाटली. मी आणि तन्मय आम्ही दोघांनी मस्त अडवा हात मारला. झकासपैकी तू आधी की मी आधी करत आम्ही दोघांनी लाडू मजेत संपवला. लाडूचा पहिला घास घेतला आणि वाटलं की तिच्या सारखा लाडू मला जमलाच नाहीये. तिच्या लाडूसारखी चव माझ्या लाडूला कधी येणार? पण तन्मयनी मात्र पहिल्याच घासाला म्म्म्म्म्म्म यमी... असं म्हणत खाल्ला.

विचित्र आहे ना हे? कदाचित माझ्या आजीच्या हातचा लाडू माझ्या आईला मस्त यमी लागत असणार आणि ती पण असाच विचार करत असणार की "त्या लाडूसारखा लाडू मला कधी येणार?" आणि मला मात्र तन्मयसारखं तिच्या हातच्या लाडूची चव मस्त लागत असणार. माझी आई म्हणायची की "आमची अम्मा (म्हणजे तिची आई) खुप छान स्वयंपाक करायची. तशी चव कोणाच्या हाताला नाही." पण ती काही म्हणो मला माझ्या आईनं केलेलं जेवण चविष्ट लागतं. कदाचित आई या व्यक्तिमत्वालाच एक खमंग चव असावी.

What u say?

24 February 2010

Sachin Tendulkar's 200 Against SA...

Outstanding is the only word that can be used for his innings... The greatest and the only player in the history of cricket to hit a double century in ODIs, against South Africa at Gwaliar on 24th Feb 2010! None other than Sachin Ramesh Tendulkar.... our own Tendlya... Sachya.... The Master blaster for rest of the world.... Man of records... Man of passion for his field... words not enuf to speak about him...

Match started by 2pm. Sehwag was out when score was just 25 in 3.5 overs. I thought its not worth watching match.. Sachin was still in the field. Anyway I like watching Sachin's batting. Karthik came in and match started at a regular pace... it was nerve breaking... Specially Sachins shots.. just sixes, fours and a few doubles.. they were arrogant towards bowlers. Steyn gave 89 runs at 8.9 rpo... Kallis gave away 88 runs at 8.8 rpo... and specially Parnell..... Oh gosh.. He awarded 95 runs at 9.5 rpo.... Sachin and Karthik made 192 runs partnership where Karthik's contribution was 79 runs. Sachin was on 125 when Karthik was out for 79... Mahi came in... Arrogance continued when Mahi took charge and made his 67 runs off 35 balls which included 4 sixes and 7 fours. Sour isnt it??? Quiet Spicy... but was just yummy for me. full of taste and full of energy... it was last over of Indian inning and Mahi was hitting hard... Sachin was 199 not out... Mahi gave him strike and he made it... 200 Not out..... off 147 deliveries...

Just awesome... worth spending time to watch Sachin playing.....

Indians are out in the field... Sachin is thr in field... still having energy to field... Mahi happy for batting performance...... Obviously... Indian team made Indian feel proud.......